Thursday, 13 August 2015

असंच काही

एकटेपणा इतकं विषण्ण करणारं दु:ख जगात दुसरं नसेल. आजूबाजूला माणसांचा समुद्र असतो,गर्दीचा कोलाहल असतो तरी सुद्धा त्या साऱ्या मध्ये आपण तनहा असतो.ही तन्हाई हे एकटेपण रात्रीच्या तिसऱ्या प्रहार इतकं काळजाला जखमी करणारं असतं.शुभ्र चांदण्या रात्री तळ्याच्या चमचमणाऱ्या काठावरच्या उदास झाडासारखे असते....डोहात स्वतःचं प्रतिबिंब पाहणाऱ्या निस्तेज औदुंबरा सारखे असते...मग आपोआपच मन कुणाला तरी साद घालते..
                                      'अकेले है चले आओ जहां हो..
                                       कहा आवाज दे तुमको कहां हो....' ही आर्तता मनाला वितळवणारी असते...मनाला भाव विभोर करणारी असते...कुणी तरी सोबतीला असावे हेच खरे....

No comments:

Post a Comment